एमएसआरडीसी-सत्ताधाऱ्यांत कसलाही ताळमेळ नाहीच

एमएसआरडीसी-सत्ताधाऱ्यांत कसलाही ताळमेळ नाहीच

Published on

75241


एमएसआरडीसी-सत्ताधाऱ्यांत
कसलाही ताळमेळ नाही

डॉ. परुळेकर ः ‘शक्तिपीठ’प्रश्‍नी टीका

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ ः सिंधुदुर्गातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला होणारा विरोध लक्षात घेता या महामार्गाचा मार्ग बदलून तो झिरो पॉईंट झाराप येथे मुंबई-गोवा महामार्गाला मिळणार आहे आणि तो पुढे रेडी बंदराला जोडला जाईल, असे पालकमंत्री नीतेश राणे यांनी सांगितले. याचा अर्थ एमएसआरडीसी आणि सत्ताधारी राज्यकर्त्यांमध्ये कसलाही ताळमेळ नसल्याचा आरोप शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला.
डॉ. परुळेकर यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की, गेळे-आंबोलीपासून फणसवडे, घारपी, फुकेरी, असनिये, तांबोळी, डेगवे अशा ईकोसेन्सिटीव्ह गावांमधून शक्तिपीठ महामार्ग नेण्याचे नियोजन ज्या एजन्सी किंवा एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी केले, जमिनीचे सर्वेक्षण केले त्यावेळी शासनकर्ते, सत्ताधारी राज्यकर्ते काय करत होते? जिल्ह्यातील ३८ किलोमीटर महामार्गापैकी ३० किमी महामार्ग हा बोगद्यातून जाणार अशी दिशाभूल जे महसूल अधिकारी करत होते त्याला जबाबदार कोण? आज हा सर्व भोंगळ कारभार महामार्गाच्या नियोजनाच्या वेळीच दिसत आहे. हा महामार्ग किती सुर‌क्षित असेल? त्याचे भविष्य काय असेल० याबद्दल सामान्य जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मुळात नागपूर ते रत्नागिरी असा राष्ट्रीय महामार्ग असताना शक्तीपीठ महामार्गाची गरजच काय० असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com