मुख्याधिकारी नसल्याने सावंतवाडी शहरातील कामांचा खोळंबा
75291
‘मुख्याधिकारीच नसल्यामुळे
सावंतवाडीत कामे रखडली’
सावंतवाडी, ता. ४ ः मुख्याधिकारी नसल्यामुळे शहराचा कारभार बेभान पद्धतीने सुरू आहे. कर्मचाऱ्यांना कोणतेही सोयर-सुतक नाही. त्यामुळे आरोग्याचे, पाण्याचे, रस्त्याचे अनेक प्रश्न रेंगाळले आहेत. तात्काळ या ठिकाणी कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमावा, अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे युवा नेते आशिष सुभेदार यांनी केली आहे.
श्री. सुभेदार यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, मुख्याधिकाऱ्यांच्या सततच्या बदल्यांमुळे शहरातील कामांचा खोळंबा होत आहे. त्यामुळे याला जबाबदार कोण? या ठिकाणी कार्यरत असलेले सागर साळुंखे हे पालकमंत्री नीतेश राणे यांचे ओएसडी म्हणून रुजू झाले. त्यांच्यानंतर आलेले मुख्याधिकारी अवघ्या दोन महिन्यांतच बदली होऊन गेल्यामुळे शहरातील अनेक महत्त्वाची कामे रखडली आहेत. पाणीपुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती आणि इतर अनेक नागरी सुविधांशी संबंधित प्रश्न प्रलंबित आहेत. मुख्याधिकारी नसल्याने निर्णय प्रक्रिया थांबली असून त्याचा थेट परिणाम जनतेला सोसावा लागत आहे. या सततच्या बदल्यांमुळे आणि मुख्याधिकारी नसल्यामुळे जनतेची हेळसांड होत असल्याचे श्री. सुभेदार यांनी पत्रकात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.