भात उत्पादनाकरिता ४ सुत्री लागवड आवश्यक
भात उत्पादनाकरिता
चारसूत्री लागवड
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ५ ः प्रत्येक शेतकऱ्याने पारंपरिक भातशेतीला बगल देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भातशेतीच्या उत्पादनाकरिता चारसूत्री भात लागवडीचा अवलंब करणे काळाची गरज असून, भविष्यात भातशेतीचे उत्पादन चांगल्याप्रकारे मिळू शकेल आणि आर्थिकदृष्ट्या भातशेती करणे परवडेल, याकरिता शेतकऱ्याने भात लागवडीचा अवलंब केला पाहिजे, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी रवींद्र माळी यांनी केले. चारसूत्री लागवडीचे प्रात्यक्षिक शेतीबांधावर घेताना ते बोलत होते.
खेड तालुक्यातील कुरवळ जावळी येथे चारसूत्री लागवडीचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. या वेळी खेड तालुका कृषी अधिकारी रवींद्र माळी यांनी स्वतः चारसूत्री लागवड केली त्यासोबतच मंडळ कृषी अधिकारी कार्यालय लवेल येथील सर्व साहाय्यक कृषी अधिकारी व उपकृषी अधिकारी उपस्थित होते. अनंत उतेकर यांच्या शेतावरती प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.