-वणवा मुक्त अभियानाला आमदार जाधवांमुळे चालना
‘वणवा मुक्त अभियानाला’ला भास्कर जाधव यांच्यामुळे चालना
उदय सामंत ः चिपळुणातील कार्यक्रमात श्रेय देत दाखवली राजकीय परिपक्वता
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ७ ः राज्यात सुरू झालेल्या वणवा मुक्त अभियानाला तत्कालीन राज्यमंत्री आणि जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री भास्कर जाधव यांनी चालना दिली, अशी आठवण पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी (ता. ५) चिपळूण येथे झालेल्या कार्यक्रमात सांगितली. राजकारणातील कडव्या प्रतिस्पर्ध्याला कमी लेखून एखाद्या कामाचे श्रेय घेण्यासाठी सर्वत्र स्पर्धा सुरू असते. मात्र उदय सामंत यांनी वणवामुक्तीचे श्रेय भास्कर जाधव यांना दिल्यामुळे सर्वच अचंबित झाले होते. मात्र या निमित्ताने मंत्री सामंत यांनी राजकीय परिपक्वता दाखविल्याचे निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.
ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव आणि एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते उद्योग मंत्री उदय सामंत पूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होते. २००९ मध्ये आघाडीचे सरकार आल्यानंतर वरिष्ठ आमदार म्हणून भास्कर जाधव यांना राज्य मंत्रिपदाची संधी मिळाली. वन खात्यासह अकरा खात्याचे ते राज्यमंत्री झाले. तेव्हा राज्यात वणवा मुक्त अभियान त्यांनी सुरू केले. नंतरच्या काळात भास्कर जाधव यांचे मंत्रिपद काढून उदय सामंत यांना देण्यात आले. जाधवांची सर्व खाती सामंत यांना देण्यात आली. भास्कर जाधव यांना केवळ चार वर्षे मंत्रिपद मिळाले. मात्र उदय सामंत मागील तेरा वर्ष राज्याच्या मंत्रीमंडळात आहेत. सत्तेत असताना त्यांनी राजकीय संतुलन राखण्याचा प्रयत्न केला. विरोधकांवर निशाणा साधताना मित्रपक्षावर अप्रत्यक्ष आघात होणार नाही, याची काळजी घेतली. मात्र विरोधी बाकावर बसलेले भास्कर जाधव यांनी अनेक वेळा सामंत यांच्यावर टीका केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.