कवी संमेलन हे समाजमनाचे दर्पण

कवी संमेलन हे समाजमनाचे दर्पण

Published on

75943

कवी संमेलन हे समाजमनाचे दर्पण

संध्या तांबे; कट्टा येथे सोहळ्यात बरसल्या कवितांच्या सरी

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ७ ः आजकालच्या मोबाईल संस्कृतीतही कवी साहित्य संमेलन यशस्वी होते. कवी संमेलनात समाजमनाचे दुःख मांडले जाते. आपण शब्द ऐकतो ते हृदयात राहतात, कविता करतो त्या ओळी कधी पुसट होत नाहीत. चर्मकार समाज उन्नती मंडळाने पुढाकार घेऊन आयोजित केलेले साहित्य कवी संमेलन आदर्शवत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका कवयित्री संध्या तांबे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या विद्यमाने व सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ यांच्यातर्फे जिल्हास्तरीय मराठी साहित्य कवी संमेलनाचे आयोजन कट्टा येथे ओम साई गणेश मंगल कार्यालयात केले होते. संमेलनाच्या अध्यक्षा तथा ज्येष्ठ साहित्यिका संध्या तांबे यांनी उपस्थितांना संबोधित केले. संमेलनाचे उद्‍घाटन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य विठ्ठल कदम यांच्या हस्ते झाले.
संमेलनाचे प्रमुख अतिथी लेखक, कवी, रंगकर्मी व रंगभूमी सेन्सॉर बोर्डाचे सदस्य विजय चव्हाण यांनी, एखाद्या समाज मंडळाने प्रथमच आयोजित केलेले हे साहित्य संमेलन आहे. याची नोंद विशेष करून घेतली जाईल. चर्मकार उन्नती मंडळाने साहित्य संमेलनाच्या रूपाने संस्कृती जपण्याचे कार्य केले आहे, असे सांगितले.
यावेळी आर्या ईळकर चव्हाण, संजय तांबे, राजेंद्र गोसावी, सतीश चव्हाण, शामल चव्हाण, प्रज्ञा मातोंडकर, मधुकर जाधव, अॅड. सुधीर गोठणकर, दिलीप चव्हाण, प्रगती पाताडे, सुरेश पवार, मनोहर सरमळकर, अमर पवार, मधुकर मातोंडकर, विजय चव्हाण, कवी विठ्ठल कदम आदींनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस कवितांनी रसिक मंत्रमुग्ध झाले.
संयोजक व मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. मंडळाचे पदाधिकारी नामदेव जाधव, महेंद्र चव्हाण, राजेंद्र चव्हाण, हरेश चव्हाण, उदय शिरोडकर, उत्तम चव्हाण, सहदेव शिरोडकर, सुहास मोचेमाडकर, कृष्णा पाताडे, वसंत चव्हाण, सुरेश चौकेकर, पंडित माने, सूर्यकांत दळवी आदी होते. प्रास्ताविक मंडळाचे साहित्य सांस्कृतिक समिती प्रमुख सुरेश पवार यांनी केले. संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन सरचिटणीस चंद्रसेन पाताडे यांनी केले. सदस्य मंगेश आरेकर यांनी आभार मानले.
---
...तर तिथे साक्षात विठ्ठल!
श्री. कदम म्हणाले, ‘या संमेलनामुळे आषाढी एकादशी दिनी सर्व साहित्यिक जणू पंढरीच्या वाळवंटात सामाजिक विचार पेरत असल्याचा भास होत आहे. आज दलित समाज पुढे गेला आहे. जिथे परिवर्तन आहे व जिथे चळवळ आहे, तिथे साक्षात विठ्ठल आहे. चर्मकार समाज उन्नती मंडळाचे कार्य सर्वांनाच प्रेरणादायी आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com