जिल्ह्यात सरपंचपदांची
आरक्षण सोडत १५ ला

जिल्ह्यात सरपंचपदांची आरक्षण सोडत १५ ला

Published on

जिल्ह्यात सरपंचपदांची
आरक्षण सोडत १५ ला

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ९ ः २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कालावधीकरिता जिल्ह्यातील ४३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांची आरक्षण सोडत १५ जुलैला काढण्यात येणार आहे. यामध्ये २१८ ग्रामपंचायतींचा कारभार महिलांच्या हाती येणार आहे.
जिल्ह्यात ४३२ ग्रामपंचायती असून पुढील पाच वर्षांकरिता सरपंचपदाची आरक्षण सोडत १५ जुलैला प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. जिल्ह्यातील सरपंचपदाच्या आरक्षणामध्ये ४३२ सरपंचपदांपैकी २१८ जागा महिलांसाठी आरक्षित होणार आहेत. दोन महिन्यांपूर्वी ही सोडत झाली होती; मात्र पुन्हा एकदा सोडत करण्याचे शासनाने ठरविले आहे. सरपंचपदासाठी असलेल्या आरक्षणामध्ये अनुसूचित जातीच्या २९ जागांपैकी १५, अनुसूचित जमातीच्या ३ जागांपैकी २, नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या ११७ पैकी ५९ तर सर्वसाधारण आरक्षणाच्या २८३ पैकी १४२ जागा महिलांसाठी आरक्षित असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com