एकत्र कुटुंब ही शेतकऱ्याची सर्वात मोठी गरज

एकत्र कुटुंब ही शेतकऱ्याची सर्वात मोठी गरज

Published on

rat11p2.jpg-
76801
जयंत फडके

बोल बळीराजाचे--------लोगो

इंट्रो

मुळात शेती एकट्याने करायची गोष्टच नाही. बागायती असो किंवा जिरायती, घरातली माणसं असतील तर शेती...त्यातही आपलेपण असेल तर शेतीवर अवलंबित्व कधीच यात नाही. प्रत्यक्ष शेती, शेतमालाची साठवणूक-प्रतवारी, वाहतूक, विक्री, उत्पादन निर्मिती आणि विक्री, आर्थिक नियोजन, शेतीपूरक आणि संलग्न उद्योग असे अनंत उपप्रकार शेतीत समाविष्ट होतात. एकटादुकटा त्यात कुठे पुरायचा..? यामध्ये महिलांचा सहभाग आणि करिअर करण्याच्या अनंत संधी...प्रत्येकाच्या शारीरिक व बुद्धीच्या कुवतीनुसार काम...हे सारं ‘घरी शेती करतो’ या एका ओळीत संपवतोय. आपण खरंतर, एकत्र कुटुंब ही शेतकऱ्याची सर्वात मोठी गरज आहे. हे व्यक्तीमत्त्व विकास आणि व्यक्तीगत महत्वाकांक्षेत आपण पूर्ण विसरून जातो...!
- जयंत फडके, जांभूळआड, पूर्णगड रत्नागिरी


एकत्र कुटुंब ही शेतकऱ्याची सर्वात मोठी गरज

कोकणातील बळीराजा शेती सोडून शहरात स्थिरावतोय. यामागची मानसिकता थोडी विस्तारानं जाणून घेण्याचा विचार केला तर अनेक पैलू समोर येतात. कोकणात बंद होणारी घरं ही आता समस्या बनली आहे. याचे दूरगामी परिणाम सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि मुख्यतः माझ्या बळीराजाच्या पिढ्यानपिढ्यांच्या संपन्नतेवर झाला आहे. हा परिणाम फक्त कोकणची समस्या नाही हा मोठ्या शहरांच्या झालेल्या विचक्याचा मूळ प्रश्न आहे. अगदी पन्नास वर्षापूर्वी कमी शिकलेला मुलगा गावी आई-वडिलांबरोबर राहात होता. आपलं मूळ घर सुरू राहावं, या दृष्टिकोनातून आणि इतर सामाजिक कारणांमुळे आत्ता एवढा शहरी झगमगटाचा हव्यास नव्हता. गावात काका-पुतणे एकाच घरात आनंदाने, गुण्यागोविंदाने नांदत होते. पैसा कमी होता; पण नात्याला किंमत होती. शिक्षणानं पैसा कमवण्याची अक्कल शिकवली; पण माणसातली नाती जपायला अभ्यासक्रमात धडाच नव्हता. मुख्यतः शेती हा जीवनाचा आधार असल्यानं तो धंदा कधीच होऊ शकणार नाही. ती एक जीवनपद्धती आहे आणि राहणार; पण आत्ताच्या शिक्षणानं प्रत्येक शिकलेली गोष्ट किती पैशात मोजायची, याचाच हिशोब शिकवला. माजी कृषिमंत्र्यांनी शेतीवरील अवलंबित्व कमी करा. दोन-तीन भाऊ असतील तर दोघांनी शेतीतून बाहेर पडा, असा खूप मौलिक सल्ला पंधरा-वीस वर्षापूर्वीच दिला; पण मुळात शेती करणाराही सुशिक्षित हवा आणि शेतीतून बाहेर पडलेल्यांनी शेती सांभाळणाऱ्याला सांभाळायला हवे, हे सांगायचं ते विसरले. त्यामुळे शहरात स्थिर झालेले आपला मूळ पाया विसरले. मग गावी राहणाऱ्यांच्या पुढच्या पिढीलाही आपण घर, शेतशिवार सांभाळत राहून चूक तर करत नाहीना, असे वाटू लागले आणि आत्ताची गावे ओस पडायची परिस्थिती उद्भवली.
कोकणातील पारंपरिक भात, नाचणीची शेती फुकटच्या बुडबुड्यात दिसत नाहीशी झाल्येय. शेतं ओसाड पडतायत..; पण लाल तांदूळ दीडशे आणि नाचणी ऐंशी रुपयाला विकली जातेय. यांत्रिकीकरणाच्या नादात कोकणातलं पशुधन जवळपास संपलंय. दुधाच्या, भाजीपाल्याच्या गाड्या पश्चिम महाराष्ट्रातून रोज कोकणात येतायत. नव्हे, आपण त्यावर अवलंबून आहोत. आंबा, काजू आणि मासेमारी गुरख्यांच्या जीवावर होते. कोकणातला शेतकरी एका घराची विभक्त होऊन चार घरं बांधून त्यांना कुलपं लावून मोठ्या शहरात धावतोय. तिथं तो पडेल ते काम करतोय; पण गावी भावाचं-काकाचं ऐकणं त्याला कमीपणाचं वाटतंय. कामाची विभागणी, कष्टाचं मोल, वेळेचं महत्व, टीमवर्क सारं सारं त्या झगमगाटात पटतं मग रक्ताच्या नात्याच्या सूचना त्याला का जाचतात..? खरंच, असं तो काय मिळवतो?
शेतीचा-शेतकऱ्याचा जीवनानंद हा नवनिर्मितीचा आनंद आहे. फक्त ‘मी’चा ‘आम्ही’ व्हायला हवा. कोकणात काही कमी नाही. निसर्गानं भरभरून वरदान दिलंय आणि आपण कुठे झोळ्या पसरत बसलोय? बागायती, पर्यटन, प्रक्रिया उद्योग यात अनंत संधी आणि कल्पनेहून जास्त पैसा आहे. एकत्र कुटुंबात त्याग आणि लाभ यांचं अफलातून कॉम्बिनेशन आहे..भविष्यातल्या अनंत संधी आहेत..परिश्रमाचं चीज आहे..समाधानाचं कोंदण आहे..कधीतरी मागे वळूनही पाहायला हवं..सेकंदकाट्यावर धावणाऱ्यांनी निवांत शहाळ्याचं पाणी प्यायला हवं.

(लेखक प्रगतीशील आणि प्रयोगशील शेतकरी आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com