मुलांच्या सर्वागिण विकासाकडे पालकांनी लक्ष द्यावे
kan143.jpg
77395
कणकवलीः येथील संत निरंकारी मंडळाच्या बाल संत समागम कार्यक्रमात बोलताना मुकेश परमार आणि उपस्थित निरंकारी मंडळाचे कार्यकर्ते
मुलांच्या सर्वागिण विकासाकडे पालकांनी लक्ष द्यावे
मुकेश परमारः कणकवलीत निरंकारी बाल संत समागम
कणकवली, ता.१५ः मुलं ही ओल्या मातीप्रमाणे असतात, ज्यांना जसा आकार दिला जाईल, तशी ती घडतात. मात्र, आजच्या धावपळीच्या जीवनात मुलांकडे लक्ष देण्यास पालकांना वेळ नसतो. समाज तसेच घरातील वातावरणाचा मोठा परिणाम मुलांवर होत असतो. त्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी वेळ काढावा, असे आवाहन संत निरंकारी मंडळाचे गुरू मुकेश परमार यांनी केले.
शहरातील मातोश्री मंगल कार्यालयात झोनस्तरीय निरंकारी बाल संत समागम कार्यक्रम झाला. यात श्री. परमार यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, नियमित अभ्यासक्रमाबरोबरच मुलांमध्ये सद्भावना, एकता आणि समानता रूजावी. प्रत्येक मुल पुढे जाऊन चांगला माणूस बनावा यासाठी पालकांनी मेहनत घ्यायला हवी.
आर्या नार्वेकर हिने सूत्रसंचालन केले. तर आभार संत निरंकारी मंडळाचे कणकवली सेक्टर संयोजक विलास जाधव यांनी मानले. यावेळी ब्रह्मज्ञान प्रचारक विजय मडगांवकर यांनीही विचार मांडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेश पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सेवादल कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.