रत्नागिरी- न्यायवैद्यक शास्त्र वकिली क्षेत्रात अतिशय गरजेचे

रत्नागिरी- न्यायवैद्यक शास्त्र वकिली क्षेत्रात अतिशय गरजेचे

Published on

७७४४५

न्यायवैद्यक शास्त्र वकिलीत आवश्यक
ॲड. सुशील अत्रे ः रत्नागिरी बार असोसिएशनतर्फे कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ : ‘‘नवे फौजदारी कायदे आल्यानंतर आता गंभीर गुन्ह्यांच्या तपासात फॉरेन्सिक तज्ज्ञांचा अहवाल घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे वकिली क्षेत्रात नव्याने उतरलेल्या वकिलांनी न्यायवैद्यक शास्त्राचा अभ्यास करणे आवश्‍यक बाब बनली आहे. तो विषय विधी अभ्यासक्रमात अगदी मोजक्या महाविद्यालयांत शिकवला जातो. खरे तर, तो आता अनिवार्य विषय असला पाहिजे,’’ असे प्रतिपादन अॅड. सुशील अत्रे यांनी केले. रत्नागिरी बार असोसिएशनतर्फे येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
न्यायवैद्यक विषयावरील पुस्तके बहुतेक सगळी डॉक्टरांनी लिहिलेली आहेत. ती वैद्यकीय बाजूवर भर देणारी आहेत; मात्र ॲड.‌ अ. वा. अत्रे यांनी लिहिलेले पुस्तक वकिलांसाठी आणि न्यायालयीन बाजूवर भर देणारे आहे. फिर्यादी पक्ष असो किंवा बचावपक्ष, डॉक्टरांना कोणते प्रश्न विचारणे आवश्‍यक आहे आणि का आवश्‍यक आहे याची थोडक्यात आणि सोप्या भाषेत माहिती दिली. पितृत्व, मृत्यू आणि बलात्कार या खटल्यांतील गुंतागुंत आणि बारकावे न्यायवैद्यक शास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचे असून, अंतिम सत्याकडे जाण्यास मदत होते. या विषयावर जळगावचे ॲड. सुशील अत्रे यांनी मार्गदर्शन केले. अॅड. अत्रे यांचा सत्कार रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com