पावसाचे वातावरण; मात्र हलक्या सरी
पावसाचे वातावरण; मात्र हलक्या सरी
सिंधुदुर्गातील चित्र ः भातरोप पुर्नलागवड रखडली
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १४ ः जिल्ह्यात आज पहाटे दमदार बरसल्यानंतर पावसाचा जोर वाढेल, अशी आशा होती. परंतु, दिवसभर केवळ पावसाचे वातावरण राहीले. मात्र, अपेक्षित पाऊस झाला नाही. काही भागात अधूनमधून जोरदार सरी झाल्या. अपेक्षित पावसाअभावी जिल्ह्यात भातरोप पुनर्लागवडीचा खोळंबा झाला आहे.
जिल्ह्यात गेल्या दहा-बारा दिवसांपासून पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत आहेत. अधूनमधून हलक्या सरी आणि त्यानंतर बराच वेळ पाऊस उघडीप देत आहे. त्याचा मोठा परिणाम भातरोप लागवडीवर झाला आहे. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली रोप लागवड पुर्णतः थांबली आहे. पाणथळ जमीनीतील भातरोप लागवड सुरू आहे. जिल्ह्यात अजूनही ३० हजार हेक्टरवरील भातरोप पुर्नलागवड शिल्लक आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
आज पहाटे पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे पावसाचा जोर वाढेल, अशी अपेक्षा होती. परंतु, दिवसभर पावसाचे वातावरण राहीले. काही भागात जोरदार तर काही भागात हलक्या सरी अधूनमधून झाल्या. परंतु, अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे भातरोप लागवडीला गती मिळत नसल्याचे चित्र आहे. लागवडीला उपयुक्त पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
चौकट
पुढील तीन-चार दिवस हलका पाऊस
जिल्ह्यात सध्या पावसाचे प्रमाण कमी झाल्याने भातरोप लागवड रखडली आहे. आज पावसाचे प्रमाण काही अंशी वाढले असले तर हवामान विभागाने पुढील तीन चार दिवस केवळ ५ ते १५ मिलीमीटर पावसाचा अंदाज दिला आहे. त्यामुळे भातरोप लागवडीचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.