-जिल्ह्यात दिवसभर जोरदार सरी

-जिल्ह्यात दिवसभर जोरदार सरी

Published on

-rat१४p२५.jpg-
P२५N७७५३७
पावस ः पावस पंचक्रोशीत पडणाऱ्या जोरदार पावसामुळे लावणीची कामे वेगाने सुरू आहेत.
(सुधीर विश्वासराव ः सकाळ छायाचित्रसेवा)
----
जिल्ह्यात दिवसभर जोरदार सरी
बळीराजा सुखावला ; भातखेचरामध्ये साचले पाणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ ः मागील आठवडाभर जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर पूर्णतः ओसरलेला होता; मात्र सोमवारी (ता. १४) दिवसभर जोरदार सरी कोसळत होत्या. त्यामुळे बळीराजा सुखावला असून, कोरड्या पडलेल्या भातखेचरात पाणी साचू लागले आहे. पुढील २४ तासात पावसाचा जोर राहील, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
सोमवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोविस तासात जिल्ह्यात सरासरी २०.१४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यात मंडणगड १७.२५, खेड ३२.२८, दापोली २०.१४, चिपळूण २८, गुहागर ११.४०, संगमेश्वर २०.५०, रत्नागिरी १५.७७, लांजा २६, राजापूर १० मिमी पाऊस झाला आहे. मागील आठवड्यात पावसाचा जोर कमी झालेला होता. अधुनमधून एखादी सर पडून जात होती. त्यामुळे भातलावण्यांच्या कामांना खीळ बसली होती. दुपारी पडणाऱ्या उन्हामुळे कातळावरील भातरोपांना फटका बसलेला होता. त्या ठिकाणच्या भातलावण्या पूर्ण करण्याचे मोठे आव्हान होते; मात्र अधूनमधून पडणाऱ्या सरींचा आधार घेऊन काही शेतकऱ्यांनी पहिल्या आठवड्यात भातलावण्या आटपून घेतल्या. पुढे सलग आठ दिवस पाऊस कमीच राहिल्याने बळीराजाची चिंता वाढली. भातखाचरात पाणी नसल्यामुळे रोपांची वाढ कशी होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. आज सकाळपासून सरींना सुरुवात झाल्याने शेतीला फायदा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com