साखरपा-डॉ. नारळीकरांच्या पत्ररुपातील आठवणी जपल्या
डॉ. जयंत नारळीकर जयंती विशेष---लोगो
फोटो ओळी
-rat18p7.jpg, rat18p8.jpg
78287, KOP25N78286
साखरपा : दीपश्री सावंत यांना आलेली डॉ. जयंत नारळीकर यांची पत्रे.
----------
डॉ. नारळीकरांच्या पत्ररूपातील आठवणी जपल्या
दीपश्री सावंतांच्या संग्रही; चार पत्रातून केले होते शंकासमाधान
अमित पंडितः सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. १८ : ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पत्ररूपी आठवणी दीपश्री सावंत यांनी त्यांच्या जयंतीनिमित्त उलगडून सांगितल्या. सावंत यांनी नारळीकर यांची चार पत्रे आणि त्यावरील सही जपून ठेवली आहेत. या पत्रांमुळे डॉ. नारळीकर यांच्याशी पुढेही पत्राद्वारे संवाद सुरू झाल्याचे सावंत यांनी सांगितले.
२००८मध्ये रत्नागिरीच्या नगर वाचनालयात डॉ. जयंत नारळीकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. खगोलशास्त्रावरील त्या व्याख्यानाला मूळच्या साखरपा येथील दीपश्री सावंत गेल्या होत्या. सावंत त्या वेळी मुंबई विद्यापिठाच्या रत्नागिरी उपकेंद्रातून एमएससी करत होत्या. पर्यावरणशास्त्र या विषयात त्या पदव्युत्तर शिक्षण घेत होत्या. साहजिकच डॉ. नारळीकर यांच्या व्याख्यानाबद्दल त्यांना उत्सुकता होती. त्या व्याख्यानाला अनेक शालेय विद्यार्थी आले होते. व्याख्यानानंतर नारळीकर यांच्या स्वाक्षरीसाठी ते विद्यार्थी गेले असता नारळीकर यांनी केवळ सही देण्यास नकार दिला आणि त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, तुम्हाला विज्ञानविषयक प्रश्न असतील ते लिहून पाठवा, त्याचे उत्तर देईन तेव्हा त्या पत्रावर माझी स्वाक्षरी तुम्हाला मिळेल.
या आवाहनाने प्रेरित होऊन सावंत यांनी डॉ. नारळीकर यांना त्यांच्या पुण्याच्या आयुकाच्या पत्त्यावर प्रथम पत्र पाठवून दोन प्रश्न विचारले. खग्रास सूर्यग्रहणावेळी चंद्राचा आकार सूर्यापेक्षा लहान असून, सूर्य पूर्ण झाकला कसा जातो? आणि नोर्वेमध्ये मध्यरात्री सूर्य कसा दिसतो? हे ते दोन प्रश्न सावंत यांनी पत्रातून विचारले होते. खरंतर, नारळीकर यांच्याकडून उत्तर येईल, ही अपेक्षा त्यांना नव्हती; पण त्यांची ही अपेक्षा खोटी ठरली आणि महिनाभरातच नारळीकर यांच्या दोन्ही प्रश्नाला उत्तर देणारे पत्र दीपश्री यांच्या घरी आले. त्यानंतरही सावंत यांनी आणखी तीनवेळा डॉ. नारळीकर यांच्याशी पत्रातून संवाद साधला आणि आपल्याला पडलेले प्रश्न विचारले. त्या सगळ्यावेळी नारळीकर यांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केल्याची आठवण दीपश्री यांनी सांगितली. एका प्रश्नासाठी नारळीकर यांनी उत्तरादाखल त्यांच्या आकाशाशी जडले नाते या पुस्तकाच्या काही पानांच्या झेरॉक्सही नारळीकर यांनी पाठवल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. नारळीकर गेल्याचे वृत्त समजताच दीपश्री यांना ती राहून गेलेली भेट आठवली. आजही दीपश्री यांच्याकडे नारळीकर यांनी पाठवलेली पत्रे, त्यांचे हस्ताक्षर आणि स्वाक्षरी जपून ठेवली आहे.
चौकट
राष्ट्रीय विज्ञानदिनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण
इतकेच नाही, तर आयुकामध्ये दरवर्षी होणार्या राष्ट्रीय विज्ञानदिनाच्या कार्यक्रमाला येण्याचे निमंत्रणही डॉ. नारळीकर यांनी त्यांना दिले होते. त्या कार्यक्रमात आपली भेट होईल, असेही ते म्हणाल्याचे दीपश्री यांनी सांगितले; पण त्या कार्यक्रमाला जाणे दीपश्री यांना शक्य झाले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.