
सिंधुदुर्गात मुसळधार
सह्याद्रीकडे जोर ः ४० हजार हेक्टरवर लावणी
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २२ ः जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असून जोरदार पावसामुळे नदीनाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. दमदार पावसामुळे जिल्ह्यातील भातलावणीला वेग आला आहे. जिल्ह्यात ४० हजार हेक्टरवरील लागवड पूर्ण झाली आहे.
जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) पावसाने उघडीप दिली होती; परंतु काल (ता. २०) पावसाचा जोर वाढला. सायंकाळी पावसाच्या जोरदार सरी जिल्ह्याच्या बहुतांशी भागात झाल्या. आज सकाळपासून जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, वैभववाडी, दोडामार्ग या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. या पावसामुळे नदीनाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. या तालुक्यांत जोरदार सरी कोसळत असल्याचे चित्र आहे. त्या तुलनेत देवगड, मालवण, वेंगुर्ले येथे पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत.
जिल्ह्यात १० जुलैनंतर पावसाचा जोर वाढल्यामुळे भातरोप पुनर्लागवडीला वेग मिळाला. त्यामुळे सुमारे ४० हजार हेक्टरवरील रोप लागवड पूर्ण झाली आहे. अजूनही १५ हजार हेक्टरवरील लागवड शिल्लक असून ती जुलै अखेरीपर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे.
२५ जुलैपर्यंत
ऑरेंज अलर्ट
जिल्ह्याच्या अनेक भागाला आज मुसळधार पावसाने झोडपून काढले. पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. जिल्ह्यात २५ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.