उधारउसनवारी करून मुलांना पोषण आहार
उसनवारी करून मुलांना पोषण आहार
तीन महिने शासनाचे साहित्य नाही; दुकानदारांचाही नकार
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २३ ः मुलांना सकस आहार मिळून त्यांचे आरोग्य सुदृढ व्हावे, या उद्देशाने शाळांमध्ये शासनातर्फे मोफत पोषण आहार दिला जात आहे; मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून तालुक्यामध्ये शासनाकडून उपलब्ध होणारे पोषण आहाराचे साहित्यच शाळांना उपलब्ध झालेले नाही. उधार उसनवारी करून शाळा प्रशासन अन् व्यवस्थापनाकडून मुलांना पोषण आहार दिला जात आहे.
शालेय जीवनामध्ये मुलांना सकस आहार मिळून त्यांचे आरोग्य अधिक सुदृढ व्हावे, या उद्देशाने शासनातर्फे पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांना शाळांमध्ये मोफत आहार दिला जात आहे. एप्रिल महिन्यापासून पोषण आहार शिजवून देण्यासाठी आवश्यक असलेले धान्य वा साहित्य शासनाकडून तालुक्यातील शाळांना उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे शाळा व्यवस्थापन आणि शाळेतील शिक्षकांनी उधार उसनवारीवर साहित्य उपलब्ध करून मुलांना पोषण आहार दिला आहे; मात्र साहित्य खरेदीच्या उधार उसनवारीचा बोजा शाळा व्यवस्थापन आणि शिक्षकांवर वाढत आहे. उधार उसनवारीवर खरेदी केलेल्या साहित्याचे बिल अदा होत नसल्याने दुकानदारही उधारीवर साहित्य देण्यास तयार होत नाहीत.
चौकट
पोषण आहार लाभार्थी
एकूण शाळा* ३७३
लाभार्थी मुले* १०,३३८
पहिली ते पाचवी* ७,१९०
सहावी ते आठवी* ३,१४८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.