शहराचा पाणीपुरवठा आज बंद

शहराचा पाणीपुरवठा आज बंद

Published on

रत्नागिरी शहरात
पाणी टंचाई
रत्नागिरी, ता. २६ ः भरपावसात शनिवारी (ता. २६) रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा बंद झाला. त्यामुळे ऐन पावसाळ्यात शीळ परिसरामध्ये विद्युत्‌पुरवठा खंडित झाल्याने हा प्रश्न निर्माण झाला. दिवसभरात महावितरणकडून दुरूस्तीचे काम सुरू असल्यामुळे रविवारपासून (ता. २७) शहराला नियमित पाणीपुरवठा होणार आहे. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा झाला नाही त्यामुळे भरपावसात शहरात पाणीटंचाई संकट निर्माण झाले; परंतु हा प्रश्न पालिकेच्या पाणीयोजनेचा नव्हता तर महावितरणच्या मुख्य वाहिनीत दोष निर्माण झाला. त्यामुळे विद्युत्‌पुरवठा खंडित होऊन पाणीपुरवठा बंद झाला होता. दिवसभरात महावितरणकडून दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे रविवारपासून शहराला सुरळीत पाणीपुरवठा होणार असल्याची रत्नागिरी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com