हाच काय रस्त्यांचा विकास?

हाच काय रस्त्यांचा विकास?

Published on

80327

हाच काय रस्त्यांचा विकास?

प्रवाशांचा प्रश्‍न; ‘सातुळी-बावळाट’वर धोकादायक खड्डे


सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २७ ः सातुळी-बावळाट रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे प्रवाशांसाठी मोठे संकट बनले असून, यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ‘हाच काय विकास?’ असा प्रश्न नागरिक, वाहनचालक तसेच पर्यटकांतून विचारला जात आहे.
सातुळी ते बांदा मार्गावरून दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी व पर्यटक प्रवास करतात. दाणोली, सातुळी, बावळाट, सरमळे, विलवडे व बांदा या गावांना जोडणाऱ्या या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. काही ठिकाणी रस्त्याचे कामे सुरू असले तरीही ते संथ गतीने चालू असून कोणतेही ठोस नियोजन दिसून येत नसल्याचे कोल्हापूरवरून गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांनी सांगितले. खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात हे खड्डे पाण्याने भरून अधिक धोकादायक ठरत आहेत. लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात विकासाच्या नावाखाली निधी खर्च केला जातो. मात्र, प्रत्यक्षात याचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचतो काय? असा सवाल करत ‘हाच काय विकास?’ असे बोलले जात आहे.
------------
कोट
आंबोली व गोव्याला ये-जा करण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. पर्यटनवाढीच्या गप्पा मारणाऱ्यांसाठी ही स्थिती डोळे उघडून पाहण्यासारखी आहे. जिल्हा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.
- गुरुदास गवंडे, सचिव, मनसे, सावंतवाडी विधानसभा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com