‘एसटी बससेवा
मंत्रालयापर्यंत द्या’

‘एसटी बससेवा मंत्रालयापर्यंत द्या’

Published on

‘एसटी बससेवा
मंत्रालयापर्यंत द्या’
कणकवली ः राज्यातील जनतेला समस्या मांडण्यासाठी वारंवार मंत्रालयात जावे लागते. तसेच कोकणातील मंडळी मुंबईतील कुलाबा, गिरगाव, काळबादेवी या परिसरात वास्तव्यास आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने ‘प्रवाशी तिथे एसटी बस’ हे ब्रीद वाक्य अमंलात आणण्यासाठी मंत्रालयापर्यंत बससेवा सुरू करावी, अशी मागणी कोकण विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी केली आहे. केळुसकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कर्नाटकात एसटी महामंडळाच्या खेड्यापाड्यांतील बहुतांश गाड्या बंगळूरू येथील मंत्रालयापर्यंत जातात. त्यामुळे सर्वसामान्यांचे टॅक्सी, रिक्षाचे भाडे वाचते. एसटी महामंडळाच्या बस केवळ मुंबई मध्यवर्ती स्थानकापर्यंत सेवा देतात. त्यामुळे प्रवाशांना टॅक्सी भाड्यापोटी अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतात. म्हणूनच एसटी महामंडळाने ग्रामीण वा शहरी भागातून येणाऱ्या प्रवाशांसाठी मंत्रालयापर्यंत बसेस न्याव्यात.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com