रत्नागिरी- २ ऑगस्टला व्यवहार बंद राहणार

रत्नागिरी- २ ऑगस्टला व्यवहार बंद राहणार

Published on

टपाल कार्यालयाचे व्यवहार
दोन ऑगस्टला बंद राहणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ : भारतीय टपाल विभागाने टपाल सेवांमध्ये डीजिटल परिवर्तन घडवण्यासाठी आयटी २.० उपक्रमात एपीटी अॅप्लिकेशन ही नवीन प्रणाली लागू करण्यात येत आहे. यासाठी २ ऑगस्टला एक दिवस टपाल कार्यालयाचे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांनी आवश्यक सेवेचे नियोजन त्याप्रमाणे करण्याचे आवाहन डाकघर अधीक्षकांनी केले आहे.
येत्या ४ ऑगस्टला रत्नागिरी डाक विभागातील दोन्ही प्रधान डाकघरे रत्नागिरी व चिपळूण आणि त्या अंतर्गत येणाऱ्या उपडाकघरांमध्ये, शाखा डाकघरांमध्ये नवीन प्रणाली लागू करण्यात येणार आहे. एपीटीचा उद्देश हा सुधारित वापरकर्ता अनुभव, जलद सेवा वितरण आणि अधिक ग्राहक-स्नेही सेवा प्रदान करणे हा आहे.
नव्या प्रणालीमुळे व्यवहार जलद, अचूक व ग्राहकाभिमुख होणार असल्याचा विश्वास रत्नागिरीच्या डाकघर अधीक्षकांनी व्यक्त केला. त्यासाठी प्रणाली पडताळणी व संरचना प्रक्रिया २ ऑगस्टला होणार आहे. त्या दिवशी टपाल कार्यालयाचे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com