कोकणातील युवक-युवतींनी मोठी स्वप्ने पहावीत
rat२९p१७.jpg -
OP२५N८०७१८
लांजा ः लांजा येथे कोकण पोलिस भरती प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करताना आलोकनाथ महाराज, नीलेश सांबरे, आमदार किरण सामंत, माजी आमदार राजन साळवी, लांजा तहसीलदार प्रियांका ढोले.
---
...तरच कोकणचा कायापालट होईल!
नीलेश सांबरे ः जिजाऊ संस्थेतर्फे लांज्या तालुक्याला रुग्णवाहिका
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २९ः तुम्ही-आम्ही ठरवले तर कोकणचा कायापालट व्हायला वेळ लागणार नाही. कुटुंबाप्रमाणेच आम्ही आपल्यासोबत आहोत. स्थानिक भूमिपुत्र गावच्या पोलिसपाटीलपासून ग्रामसेवक, तलाठी, सीईओ, तहसीलदार ते जिल्हाधिकारीपर्यंत बसेल, तेव्हा सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल, असे प्रतिपादन जिजाऊ शैक्षणिक, सामाजिक संस्थेचे संस्थापक तथा शिवसेना उपनेते नीलेश सांबरे यांनी केले.
लांजा येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे अजिंक्य मंगल कार्यालयात आयोजित कोकण पोलिस भरती प्रशिक्षण केंद्र व स्पर्धा परीक्षा वाचनालय उद्घाटनावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आलोकनाथ महाराज, आमदार किरण सामंत, माजी आमदार राजन साळवी, लांजा तहसीलदार प्रियांका ढोले, लांजा पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे, प्रसिद्ध व्याख्याते प्रा. गणेश शिंदे, साहाय्यक पोलिस निरीक्षक आमोद सरंगले, जिजाऊ संस्थेचे राज्य सचिव केदार चव्हाण, सुनील कुरूप जिजाऊचे जिल्हाध्यक्ष अॅड. महेंद्र मांडवकर, योगेश पांचाळ उपस्थित होते. यावेळी श्री. सांबरे म्हणाले, ज्या सुविधा आम्हाला मिळत आहेत, त्या सर्वसामान्य व गरीब कुटुंबांना मिळायला हव्यात. माणसाने ठरवले तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही, फक्त स्वप्नं मोठी पाहायला पाहिजेत. तरच तो मोठ्या पदापर्यंत पोहोचेल. तुमच्यासाठी जिजाऊने दरवाजे उघडे ठेवले आहेत, फक्त इच्छाशक्ती दाखवा. कोकणातील युवक-युवतींनी मोठी स्वप्ने पाहायला हवी. प्रयत्नवादी होऊन यश जिंकता यायला हवे तरच स्वतःसह आपल्या आई-वडील, जिल्हा, राज्याचे, देशाचे नाव उज्ज्वल होईल, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी जिजाऊ संस्थेच्यावतीने लांजा तालुक्यासाठी देण्यात आलेल्या नव्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण व पोलिस प्रशिक्षण केंद्र, स्पर्धा परीक्षा वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर तालुक्यात दहावी, बारावी, पदवी, विविध परीक्षा व स्पर्धांमध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव तर समाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, प्रशासकीय खात्यांमधील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
चौकट
रत्नागिरीत सीबीएसई शाळा उभारू
ठाणे, पालघर जिल्ह्यात जिजाऊने सीबीएसईच्या दहा शाळा सुरू केल्या आहेत. पालकमंत्री आपल्या जिल्ह्याचेच आहेत. त्यांना विनंती केली आहे की, शासकीय किंवा कमी दरामध्ये जागा असेल तर ती आम्हाला विकत द्या. त्या जागेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण सीबीएसई शाळा सुरू करू. जेणेकरून तिथे गोरगरिबांची मुले शिक्षण घेतील, असे सांबरे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.