रत्नागिरी-स्वच्छ भारत मिशनचे सरपंच संवाद ॲप

रत्नागिरी-स्वच्छ भारत मिशनचे सरपंच संवाद ॲप

Published on

स्वच्छ भारत मिशनचे सरपंच संवाद ॲप
वैदेही रानडे ः दर्जेदार कामे शेअर करणे शक्य
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ ः स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) आणि जलजीवन मिशन विभागाने सरपंच संवाद ॲप विकसित केले असून, त्या द्वारे गावातील उत्तम व दर्जेदार कामे सरपंच शेअर करू शकतात. या ॲपचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले आहे.
केंद्रीय जलशक्तीमंत्री सी. आर. पाटील यांच्या हस्ते केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत ‘स्वच्छ व सुजल ग्रामसाठी नेतृत्व’ या कार्यक्रमात ‘सरपंच संवाद’ मोबाइल अॅपचे लोकार्पण करण्यात आले आहे. क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेच्या सहकार्याने हे अॅप विकसित केले आहे. ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता, संवाद आणि नवीन उपक्रमांची देवाणघेवाण वाढवणे हा या अॅपचा उद्देश आहे. या अॅपद्वारे सरपंच आपल्या गावातील उत्तम कामकाज शेअर करू शकतात. देशभरातील इतर गावांमधील यशोगाथा पाहू शकतात. विविध विषयांवरील प्रशिक्षण घेऊ शकतात. हे अॅप स्वच्छ भारत (ग्रामीण) आणि जलजीवन मिशन या दोन्ही अभियानांच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यास मदत करणारे प्रभावी डिजिटल साधन आहे. जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी हे अॅप तत्काळ डाऊनलोड करून त्याचा नियमित व योग्य वापर करावा. त्यामुळे गाव स्वच्छ, सुजल व शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करू शकेल. ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी हे ॲप निश्चितच उपयुक्त ठरणार आहे, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com