-गाव, वाड्यांना जोडणारे २९ साकव धोकादायक
25N83296
गाव, वाड्यांना जोडणारे २९ साकव धोकादायक
चार तालुक्यातील स्थिती; ३८६ साकवांची दुरुस्ती आवश्यक, ग्रामविकास विभागाला प्रस्ताव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये विविध गावे, वाड्यांना, वस्त्यांना जोडणारी २९ साकव धोकादायक बनले आहेत. त्याची दुरुस्ती आवश्यक आहे. ३८६ साकव दुरुस्तीला आले आहेत. जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या पाहणी अहवालामध्ये हे स्पष्ट झाले आहे. यासाठी सुमारे ३० कोटी ९२ लाखांच्या निधीची गरज आहे. तसा प्रस्ताव ग्रामविकास विभागाला पाठवण्यात आला आहे.
रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर या चार तालुक्यांतील साकवांची ही परिस्थिती आहे. या चार तालुक्यांमध्ये सुमारे ४१५ साकव आहेत. त्यापैकी संगमेश्वर तालुक्यातील ८, रत्नागिरीतील १, लांजातील १७ आणि राजापुरातील ३ असे २९ साकव धोकादायक आहेत. सर्वांत जास्त लांजा तालुक्यातील साकवांचा समावेश आहे. त्यांनाच ५ कोटी ९२ लाख निधी लागणार आहे. संगमेश्वर तालुक्यात ११५, रत्नागिरीमध्ये ९४, लांजात ७५ आणि राजापुरात १०२ साकव दुरुस्त करण्याची गरज आहे. या साकवांच्या दुरुस्तीसाठी २२ कोटी रुपये अपेक्षित आहेत. जिल्हा परिषदेने तसा प्रस्ताव ग्रामविकास विभागाला पाठवला आहे.
---
चौकट...
जिल्ह्यातील साकवची स्थिती
तालुका* एकूण साकवांची संख्या
संगमेश्वर* १२३
रत्नागिरी* ९५
लांजा* ९२
राजापूर* १०५
---
एकूण* ४१५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.