अणुस्कुरा घाटातील वाहतूक दोन तास ठप्प
-rat१९p१२.jpg-
२५N८५५०५
राजापूर ः अणुस्कुरा घाटात दरड कोसळून वाहतूक बंद झाली होती.
------
अणुस्कुरातील वाहतूक दोन तास ठप्प
दरड कोसळली ; पावसाचा जोर कायम
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १९ : मुसळधार पावसामुळे अणुस्कुरा घाटात मंगळवारी (ता. १९) सकाळी दरड कोसळली. सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यामध्ये पडलेली दरड हटवली. त्यामुळे घाटमार्गातील ठप्प झालेली वाहतूक सुमारे दोन तासानंतर पुन्हा एकदा पूर्ववतपणे सुरू झाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात संततधार सुरू आहे. आंबा घाटात सोमवारी दरड कोसळल्याने साखरपामार्गे जाण्याऐवजी अनेक वाहनचालकांकडून अणुस्कुरा घाटमार्गे जाण्याला अधिक पसंती होती. मात्र मंगळवारी घाटात मोठे दगड आणि माती खाली आली. त्यामुळे घाटमार्गातून सुरू असलेली वाहतूक ठप्प झाली होती.
घाटात दरड कोसळल्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ उपाययोजना हाती घेतल्या. त्यामध्ये जेसीबीच्या साह्याने रस्त्यामध्ये कोसळलेली दगड आणि माती बाजूला करण्यात बांधकाम विभागाला यश येऊन रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला. त्यामुळे सुमारे दोन तासानंतर घाटमार्गातून वाहतूक पूर्ववतपणे सुरू झाली. पावसाचा जोर अद्यापही कायम असल्याने वाहनचालकांनी घाटातून वाहन चालवताना दक्षता घ्यावी, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागासह पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.