दीड दिवसाच्या गणेशोत्सवातून पुनरावर्तनाचा संदेश
-rat२७p३०.jpg-
२५N८७५३०
दापोली ः जालगाव येथील डॉ. प्रशांत परांजपे यांच्या हस्ते प्रतिष्ठापित केलेली लाल मातीची गणपतीची मूर्ती.
------
निसर्गासाठी पुनरावर्तनाचा गणपती
जालगावातील परांजपेंनी जपली परंपरा; विसर्जनानंतर माती झाडांना
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २७ ः दापोली तालुक्यातील जालगाव येथील डॉ. प्रशांत परांजपे यांच्या घरी पारंपरिक पद्धतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव गेली अनेक वर्षे साजरा केला जातो. शेतातील लाल मातीपासून गणेशाची मूर्ती बनवतात. दीड दिवसाच्या गणेशोत्सवामधून यावर्षी पुनरावर्तन संकल्पना स्पष्ट केली आहे. जे निसर्गाचे आहे ते त्याला दिले पाहिजे हा उद्देश ठेवून विसर्जनानंतर ते पाणी आणि माती परिसरातील झाडांना घातली जाते.
गेली अनेक वर्षे परांजपे यांच्याकडे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवाच्या विसर्जनप्रसंगी पर्यावरणपूरक मूर्तीचे घरच्या घरीच केलेल्या कृत्रिम तलावात विसर्जन केले जाते. यानंतर दोन दिवसानंतर विसर्जित मूर्ती पाण्यात पूर्ण विरघळते. पाणी काढून टाकल्यानंतर उरलेली लाल माती ही परिसरातील झाडांना घातली जाते किंवा एखाद्या कुंडीमध्ये ठेवून त्याच्यामध्ये एखादे रोपटे लावले जाते. त्यामुळे गणपती ३६५ दिवस आपल्या परिसरात राहतो. या भावनेतून आणि निसर्गाने दिलं आहे ते निसर्गाला मिळणं आवश्यक आहे, तरच निसर्गचक्र पूर्ण होतं. यावर्षी विसर्जित केलेल्या मूर्तीची पुढील वर्षी पुन्हा याच शेतातील लाल मातीतून श्री गणेशाच्या मूर्तीची निर्मिती करून त्याची प्रतिष्ठापना केली जाते, यालाच पुनरावर्तन असं म्हटले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.