आगारातून 168 जादा फेऱ्यांचे नियोजन
लांजा आगारातून १६८ जादा फेऱ्या
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ३ ः चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी २ सप्टेंबरपासून सुरुवात झाली असल्याने लांजा आगारातून १६८ जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. गणशोत्सव मोठ्या जल्लोषात सुरू आहे. या सणासुदीला मुंबईकर मंडळी मोठ्या संख्येने कोकणात आले आहेत. मंगळवारी (ता. २) गौरी-गणपतीचे विसर्जन झाले असून, त्यानंतर चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करण्यात आली आहे. कोकणवासियांच्या परतीच्या प्रवासासाठी लांजा आगारातून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. ३ सप्टेंबर रोजी ८८, ४ ला ५१ तर ५ ला १३ आणि ६ ला २, ७ सप्टेंबरला १० जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत तसेच प्रवाशांची मागणी आणि आरक्षण झाल्यास इतर जादा गाड्याही सोडल्या जातील, असे आगारप्रमुख काव्या पेडणेकर यांनी माहिती देताना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.