संक्षिप्त
जिल्ह्यात १८पर्यंत
मनाई आदेश
रत्नागिरी ः जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी १८ सप्टेंबरपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात मनाई आदेश जाहीर करण्यात आल्याचे अप्पर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिला आहे. जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, विविध संघटना वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग मुंबई-गोवाचे काम पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येतात. अशावेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते. गणेशोत्सव ६ सप्टेंबरपर्यंत आणि ५ सप्टेंबरला ईद-ए-मिलाद हा सण साजरा होणार आहे. त्यामुळे मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.
‘वंदे मातरम’च्या
वर्धापनदिनी लोगो स्पर्धा
रत्नागिरी ः वंदे मातरम् गीताच्या १५०व्या वर्धापनदिनानिमित्त भारतमातेच्या स्तुतीचा गौरवदिन साजरा होणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून लोगो स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी पारितोषिकसुद्धा देण्यात येणार आहे. सोबतचा क्युआर कोड अथवा लिंकला भेट देऊन आपण स्पर्धेत सहभागी होऊ शकता. प्रतिसाद पाठवण्याची अंतिम मुदत १० सप्टेंबर आहे, असे आवाहन प्राचार्य र. वि. कोकरे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.