महामार्गावर ८ सप्टेंबरपासून अवजड वाहतूक होणार पूर्ववत

महामार्गावर ८ सप्टेंबरपासून अवजड वाहतूक होणार पूर्ववत

Published on

महामार्गावरील अवजड वाहतूक
सोमवारपासून पूर्ववत
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ५ : गणेशोत्सव कालावधीत महामार्गावर अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी २३ ऑगस्टपासून अवजड वाहतुकीला ब्रेक लागला. ८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजल्यापासून अवजड वाहनांची वाहतूक पूर्ववत होणार आहे.
रखडलेल्या चौपदरीकरणासह महामार्गावरून धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे गणेशोत्सवादरम्यान वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण होतो. अवजड वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूककोंडीतून गणेशभक्तांची वाहने मार्गस्थ करताना महामार्गावर तैनात पोलिसयंत्रणेची दमछाक होते. या पार्श्वभूमीवर २३ ऑगस्टपासून महामार्गावर अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. सात दिवसांच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर गणेशभक्त परतीला निघाले आहेत. यामुळे महामार्ग वाहनांच्या रेलचेलीने पुरता गजबजला आहे. ६ सप्टेंबर रोजी १२ दिवसांच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर गणेशोत्सव संपुष्टात येणार आहे. यामुळे रोखण्यात आलेली अवजड वाहतूक ८ सप्टेंबरपासून पूर्ववत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com