‘बाया पाण्याशीच बोलतात’ कविता उत्कृष्ट
97154
‘बाया पाण्याशीच बोलतात’ कविता उत्कृष्ट
डॉ. शिंदे ः अजय कांडर लिखित कवितेचा रौप्यमहोत्सव
कणकवली, ता. ८ ः सिंधुदुर्गातील कवी अजय कांडर लिखित ‘बाया पाण्याशीच बोलतात’ ही कविता मराठी माणसांच्या आकलनाचा परीघ विस्तारणारी आहे. तिचा रौप्यमहोत्सवी सोहळा इचलकरंजीत होणे हा या कवितेने निर्माण केलेला इतिहास आहे. ही कविता स्त्रियांचे पसायदान ठरु शकते इतकी महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन नामवंत समीक्षक तथा शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख रणधीर शिंदे यांनी केले.
‘बाया पाण्याशीच बोलतात’ या बहुचर्चित कवितेला यावर्षी २५ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने इचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठान आणि नाईट कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने डॉ. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नाईट कॉलेजच्या सभागृहात रौप्यमहोत्सवी सोहळा विशेष चर्चासत्र झाले. प्रा. रफिक सुरज, प्रा. एकनाथ पाटील, प्रा. संजीवनी पाटील, अजय कांडर आदींच्या सहभागाने झालेल्या या चर्चासत्रात डॉ. शिंदे यांनी ‘बाया पाण्याशीच बोलतात’ या कवितेचा धांडोळा घेतला.
अमरसिंह माने यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महावीर कांबळे, सल्लागार मधुकर मातोंडकर, नाईट कॉलेजचे प्राचार्य डॉ. विरुपाक्ष खानाज, संस्कृती प्रतिष्ठानचे पदाधिकारी अनुराधा काळे, पंडित कांबळे, संजय रेंदाळकर, प्रा. सौरभ पाटणकर, सुनिल कोकणी, मच्छिंद्र आंबेकर, दामोदर कोळी, फक्रुद्दीन पटेल आदी उपस्थित होते. गोपाळराव दुखंडे पुरस्कार मिळाल्याबद्दल मधुकर मातोंडकर यांचा तसेच कवी अजय कंडर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.