सावंतवाडी रुग्णालयात सुधारणा दिसेल

सावंतवाडी रुग्णालयात सुधारणा दिसेल

Published on

97945

सावंतवाडी रुग्णालयात सुधारणा दिसेल

रुग्ण कल्याण समिती; सहकार्य करण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ ः येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या समस्यांबाबत अभिनव फाउंडेशनने १० वर्षांपूर्वी याचिका दाखल केली असून कोल्हापूर खंडपीठात ती सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार तथ्य शोधक समिती गठित करून आढावा घेऊन अहवाल तयार केला आहे. आरोग्य विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह यांनीदेखील भेट दिली आहे. त्यामुळे निश्चितच बदल दिसतील, अशी अपेक्षा आहे. न्यायप्रविष्ट बाब असल्याने याला वेगळे वळण देऊ नये. तसेच तेथील डॉक्टर, संपूर्ण रुग्णालय कर्मचारी व रूग्णांना त्रास सहन करावा लागू नये, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन रुग्ण कल्याण नियामक समितीचे सदस्य दुर्गेश ऊर्फ देव्या सूर्याजी यांनी केले आहे.
श्री. सूर्याजी म्हणाले की, ‘अभिनव फाउंडेशन ही एक सामाजिक कार्य करणारी संस्था आहे. येथील सर्वसामान्य जनतेसाठी ते लढा देत आहेत. निश्चितच त्याचा फायदा रुग्णालयाला होताना दिसेल. त्याबाबतची जनहित याचिका कोल्हापूर खंडपीठात सुरू आहे. न्यायालयाने नेमलेली तथ्य शोधक समिती पाहणी करून गेली आहे. यात आरोग्य उपसंचालक, महाराष्ट्र बार कौन्सिलचे सदस्य ॲड. संग्राम देसाई तटस्थपणे आहेत. त्यांनी कोणत्याही प्रकारची गोष्ट लपवली जाणार नाही, असा विश्वासही दिला आहे. न्यायालयाला ते अहवाल सादर करणार असून योग्य न्याय मिळेल, हा विश्वास आहे. आरोग्य विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह देखील येऊन गेले असून त्यांनीही रुग्णालयाची पाहणी केली आहे. त्यामुळे निश्चितच सकारात्मक बदल होताना दिसतील. मात्र, यात सेवा देणारे डॉक्टर व कर्मचाऱ्यांना विनाकारण त्रास होऊ नये, याची सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. कारण प्रसूतीसह, दिवसाला ४०० बाह्यरुग्ण तपासणी व इतर बरेच रुग्ण इथे उपचार घेत आहेत. त्यांना नाहक त्रास सहन करावा लागू नये, याचीही दक्षता घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय १०० बेडचे असून बऱ्याच समस्या मार्गी लागत आहेत. एमडी फिजिशियन, न्युरोलॉजिस्ट व वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्याची आवश्यकता आहे. आरोग्य विभाग सचिवांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. त्याबाबत हालचालीही सुरू झाल्या आहेत. तसेच कोल्हापूर सर्किट बेंचकडूनही ही परिस्थिती सुधारण्यासाठी ठोस आदेश दिले जातील. त्यामुळे सद्यस्थितीत संयम बाळगण्याची आवश्यकता असून उपचार घेणाऱ्या रुग्णांची गैरसोय होऊ नये, याची दक्षता घ्यावी व सद्यस्थितीत रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टरांचे मनोधैर्य वाढवणे गरजेचे आहे, असे आवाहन देव्या सूर्याजी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com