जिल्ह्यात ४३३८ हेक्टरवरील 
पिकांची ‘अवकाळी’मुळे हानी

जिल्ह्यात ४३३८ हेक्टरवरील पिकांची ‘अवकाळी’मुळे हानी

Published on

जिल्ह्यात ४३३८ हेक्टरवरील
पिकांची ‘अवकाळी’मुळे हानी

प्रशासनातर्फे पंचनाम्यांना सुरुवात

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३ ः सततच्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील भात, नाचणी आणि इतर शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बाधित क्षेत्रांमध्ये संयुक्त पंचनाम्यांचे काम क्षेत्रीय स्तरावर सुरू असून, प्राथमिक अहवालानुसार ३१ ऑक्टोबरपर्यंत ४३३८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या नुकसानीचा फटका ५२५ गावांतील १७ हजार १७२ शेतकऱ्यांना बसला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी दिली.
जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात मुसळधार आणि सलग पाऊस झाल्याने पिकलेली भातशेती शेतातच अडकली आहे. अनेक ठिकाणी कापलेला भात पावसाच्या पाण्यात कुजला आहे. तसेच उभ्या पिकांवरही मोठा परिणाम झाला असून शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक हिरावून गेले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू केली आहे. सहायक कृषी अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्या संयुक्त पथकांमार्फत ही पाहणी केली जात आहे. ज्या शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे, त्यांनी तातडीने संबंधित ग्रामस्तरीय क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्रीमती नाईकनवरे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com