जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही

जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही

Published on

जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : जिल्ह्यातील नगर पालिका आणि नगर पंचायती निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी एकही अर्ज भरला गेला नाही. ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा असल्याने अर्जही नेण्याचे प्रमाणही शून्य आहे. महायुती किंवा महाविकास आघाडीकडून उमेदवारांची घोषण न केल्याने ही परिस्थिती आहे. १३ किंवा १४ तारखेनंतर अर्ज भरण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, खेड अशा ४ नगरपालिका आणि गुहागर, देवरूख, लांजा या ३ नगरपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्या-त्या पालिकेच्या ठिकाणी प्रशासनाने अर्ज भरण्यासाठीची यंत्रणा उभी केली आहे. त्याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यात ७ ठिकाणी १५१ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. अवधी कमी असल्याने वैयक्तिक पातळी आणि महायुती, आघाडीच्या माध्यमातून प्रचार आणि भेटीगाठी सुरू आहे. परंतु उमेदवारीच निश्चित नसल्याने अनेक इच्छुक छुप्या पद्धतीने प्रचार सुरू ठेवला आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर किंवा १३ तारखेनंतर अर्ज भरण्यास सुरवात होण्याची शक्यता आहे. १७ नोव्हेंबर हा अर्ज भरण्याचा अंतिम दिवस आहे. १८ तारखेला अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर हरकतींवर सुनावणी होऊन त्यानंतर २५ पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com