मतदान यंत्रांची जबाबदारी पोलिसांकडे

मतदान यंत्रांची जबाबदारी पोलिसांकडे

Published on

मतदान यंत्रांची जबाबदारी पोलिसांकडे
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ः राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार, नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना २१ डिसेंबरपर्यंत निकालाची वाट पाहावी लागणार आहे. या बदललेल्या तारखेमुळे निकालापर्यंत मतदान यंत्र सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी पोलिसांना सांभाळावी लागणार आहे.
जिल्ह्यात चार नगरपालिका आणि ३ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाले. यापूर्वी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार या निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबरला जाहीर होणार होता; मात्र राज्यातील काही नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीत काही उमेदवारांची हरकत घेतली होती; मात्र या हरकतीचा निकाल उशिरा लागल्याने निवडणूक आयोगाने काही ठिकाणच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे. त्यानुसार २० डिसेंबर २०२५ मतदान आणि निकाल २१ डिसेंबरला जाहीर होणार आहे. मतदान व निकालापर्यंत एकूण ५७ पोलिस अधिकारी, ५८९ अंमलदार, आरसीपीचे २ दल, एसआरपीएफची १ तुकडी व ५५० होमगार्ड मतमोजणी झाल्यानंतर मतदान यंत्र सुरक्षित ठेवल्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त कमी करण्यात येणार होता; मात्र निकालाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याने मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्राँगरूमची देखरेख करण्याची जबाबदारी पोलिसांना करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com