आजही गांधीजींसारखा निर्भय माणूस नाही

आजही गांधीजींसारखा निर्भय माणूस नाही

Published on

-rat१५p११.jpg-
२५O१०७८३
राजापूर ः गांधीविचार व्याख्यानमालेमध्ये बोलताना डॉ. आनंद मेणसे. शेजारी मान्यवर
-------
महात्मा गांधीजी यांचा निर्भय संघर्ष
डॉ. आनंद मेणसे : ओणीत गांधीविचार व्याख्यानमाला
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १५ ः महात्मा गांधीजी हे स्वातंत्र्यवादी, लोकशाहीवादी, समतावादी व धर्मनिरपेक्षवादी होते. भारतीय लोकशाहीची बिजे गांधी विचारातच रुजलेली असून, आज आपण उपभोगत असलेले लोकशाही मूल्यांचे स्वातंत्र्य हे गांधीजींच्या विचारांचे फलित आहे. महात्मा गांधी यांच्या इतका निर्भय माणूस या जगात आजही दुसरा नाही, असे स्पष्ट मत डॉ. आनंद मेणसे यांनी गांधीविचार व्याख्यानमालेमध्ये मांडले.
ओणी येथील नूतन विद्यामंदिर आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या राजापूर शाखेतर्फे गांधीविचार व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थाध्यक्ष अ‍ॅड. वासुदेव तुळसणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर, डॉ. शैलेश शिंदेदेसाई, डॉ. महेंद्र मोहन, सूर्यकांत सुतार, मुख्याध्यापक विनोद मिरगुले, जगदीश पवार, डॉ. राजाराम राठोड, कीर्तिकुमार जोशी आदी उपस्थित होते.
डॉ. मेणसे म्हणाले, महात्मा गांधी यांनी तब्बल २२ वर्षे दक्षिण आफ्रिकेत वास्तव्य केले. या काळात त्यांना वारंवार दुय्यम दर्जाची वागणूक, अपमान आणि वर्णद्वेषाचा सामना करावा लागला; मात्र या अन्यायापुढे न झुकता त्यांनी सत्य व अहिंसेच्या बळावर संघर्ष उभारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com