कृषी विद्यापीठाने तयार केलल्या ''कारळा'' तिळाचे वाण मुबलक

कृषी विद्यापीठाने तयार केलल्या ''कारळा'' तिळाचे वाण मुबलक

Published on

-rat२४p३.jpg-
२५O१३०३८
शिरगाव ः येथील संशोधन केंद्रात फुलोरा आलेले कारळा तिळाचे वाण.
-----
तीळ शेतीला ‘कारळा’ वाण देईल पुनरुज्जीवन
डॉ. नीलेश सोनोने ः रब्बी हंगामातही उपयुक्त, आंबा, काजू बागेतही आंतरपीक शक्य
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ ः कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या ‘कारळा’ या तिळाच्या वाणामुळे जिल्ह्यात दुर्लक्षित झालेल्या तीळ शेतीला चालना मिळणार आहे. विद्यापीठाने रब्बी हंगामासाठी कारळा बियाणे मुबलक उपलब्ध करून दिलेले आहे. त्यामुळे आंबा, काजू बागायतीत आंतरपीक म्हणून कारळा तिळाचे पीक घेऊन उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्याला प्रयत्न करता येतील, असा विश्वास शिरगाव येथील कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. नीलेश सोनोने यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून पारंपरिक तिळाच्या जाती वापरात असल्या तरीही त्यांची उत्पादकता कमी आहे. पारंपरिक तिळाची उत्पादकता कमी असल्यामुळे हे पीक दुर्लक्षित झाले. त्यामुळे जिल्ह्यात परदेशातून तिळाची आवक होत असते. कोकण कृषी विद्यापीठाच्या शिरगाव येथील भात संशोधन केंद्राने कारळा तिळावर संशोधन केले. त्याद्वारे नवीन वाण विकसित केले आहे. कोकण कृषी विद्यापीठाचे तिळावरील पहिलेच संशोधन आहे. विद्यापीठाने तयार केलेले हे वाण हेक्टरी ४५० ते ५०० किलो उत्पादन देते. जिल्ह्यात तीळ लागवडीचे क्षेत्र अवघे ०.२० हेक्टर इतकेच आहे. त्यामुळे रब्बी हंगामात कारळा तिळाचे पीक घेणे शक्य आहे. पडिक, वरकस, पाण्याचा निचरा होणाऱ्या जागेत तिळाचे पीक उत्तम येते. पारंपरिक वाणामुळे उत्पादकता कमी असल्याने २०१४-१५ पासून कोकण कृषी विद्यापीठाच्या शिरगाव येथील भात संशोधन केंद्रात यावर संशोधन सुरू होते. नाशिक, सोलापूर, पश्चिम महाराष्ट्रातील तिळाच्या जाती एकत्र करून संशोधन करण्यात आले. संशोधन पूर्ण होऊन कारळाचे नवीन वाण विकसित करण्यात यश आले आहे.
कारळा बियाण्याचे पीक कमी पाण्यात आणि कमी दिवसात तयार होते. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन वाणाची चाचणी सुरू आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून मागणीसाठी शेतकऱ्यांना माहिती दिली जात आहे. आंबा, काजू, बागायतीमध्ये आंतरपीक म्हणून कारळा तिळाचे पीक घेता येऊ शकते. या तीळ शेतीवर मधमाश्यांचा वावर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे बागायती शेतीत फळ उत्पादकता वाढण्यासही मदत होते. शिरगाव येथील भात संशोधन केंद्रात संशोधित केलेले पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे.
---
कोट
शेतकऱ्यांकडूनही तिळाच्या वाणासाठी केली जात असलेली मागणी लक्षात घेता विद्यापीठाचे संशोधन पूर्ण होऊन हे नवे वाण विकसित केले आहे. तीन महिन्यात पीक तयार होते. विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे पिकासाठी कमी दिवस श्रम, वेळ व पैसा कमी लागतो तिळातील तेलाचे प्रमाण ४२ टक्के आहे. ३५ ते ४० दिवसात फुलोरा येऊन ९० दिवसात पीक तयार होते.
- डॉ. नीलेश सोनोने, प्रभारी अधिकारी, कृषी संशोधन केंद्र शिरगाव, रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com