मुंबईच्या राजकारणात कोकणचा वरचष्मा
मुंबईच्या राजकारणात
कोकणचा वरचष्मा
निवडणुक रणधुमाळी ः चाकरमान्यांची भूमिका निर्णायक
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ५ ः आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत कोकणचा प्रभाव ठळकपणे दिसून येत असून, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चाकरमान्यांनी राजकीय समीकरणे बदलण्याची क्षमता पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. मुंबईत मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेले सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील मतदार हे अनेक प्रभागांमध्ये निर्णायक ठरत असल्याने सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे लक्ष कोकणपट्टीकडे केंद्रीत झाले आहे.
नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी मुंबईत स्थायिक झालेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चाकरमानी आजही आपल्या गावाशी नातं जपून आहेत. सामाजिक संस्था, कोकणी संघटना, देवस्थान ट्रस्ट, तसेच विविध उत्सवांच्या माध्यमातून ही मंडळी एकत्र येत असून, निवडणुकीच्या काळात हीच संघटित ताकद मतपेटीत उतरते. परिणामी अनेक प्रभागांमध्ये उमेदवारांचा विजय अथवा पराभव कोकणच्या मतदारांवर अवलंबून राहतो. याची जाणीव ठेवून राजकीय पक्षांनी कोकणवासीयांसाठी विशेष प्रचार मोहिमा, बैठका आणि मेळावे आयोजित करण्यास सुरुवात केली आहे.
स्थानिक प्रश्न, घरभाडे, पुनर्विकास, रोजगार, तसेच कोकणातील विकासासाठी मुंबईतून पाठपुरावा करणारे उमेदवार कोकणवासीयांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चाकरमान्यांची एकजूट, शिस्तबद्ध मतदान आणि परंपरेने चालत आलेली ‘आपल्या माणसाला साथ’ देण्याची भूमिका ही मुंबई महापालिका निवडणुकीत कोकणचा वरचष्मा अधोरेखित करत आहे. त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत कोकणवासीयांची मते ही ‘किंगमेकर’ ठरणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

