बावनदीमध्ये भरावासाठी गाळाचा उपसा
rat१६p२४.jpg-
२६O१८२०६
रत्नागिरी : बावनदीत रस्ता बनवून गाळाचे सुरू असलेले उत्खनन.
------
बावनदीमध्ये भरावासाठी गाळाचा उपसा
पात्रात बनवला रस्ता; जेसीबीने खोदकाम, प्रशासनाचा कानाडोळा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ : मुंबई-गोवा महामार्गाचे काम अनेक ठिकाणी संथगतीने सुरू आहे. त्यामुळे महामार्गाला उशीर होत आहे. पुलांची कामे रखडली आहेत. जोडरस्त्याचा भराव करण्यासाठी बावनदीमध्ये हे वारेमाप गाळाचे उत्खनन सुरू आहे. नदीत रस्ता करून जेसीबीने गाळ खणून काढल्याचा उघडउघड प्रकार सुरू आहे; परंतु प्रशासन मात्र याकडे कानाडोळा करताना दिसत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम संगमेश्वर ते लांज्यापर्यंत अनेक ठिकाणी सुरू आहे. त्यातही संगमेश्वर ते बावनदीदरम्यान पाच ते सहा ठिकाणी काम सुरू आहे. त्यातच संगमेश्वर आणि बावनदी, कोळंबे या भागात पुलांच्या भरावाचे काम हाती घेण्यात आले आहे. बावनदीच्या जोडरस्ता भरावासाठी थेट बावनदीमध्येच खड्डे खणले जात आहेत. बावनदीच्या पात्रात रस्ता करून जेसीबीच्या सहाय्याने गाळ काढला जात असून, हा गाळ भराव म्हणून रस्त्याला वापरला जात आहे. हा गाळ काढण्याची परवानगी प्रशासनाने ठेकेदाराला दिली आहे का, असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. बावनदीमध्ये पुलापासून काही भागात गाळ उपशामुळे मोठे खड्डे पडले आहेत. भविष्यात गुरे घेऊन जाणारे किंवा मच्छीमारीसाठी जाणाऱ्या ग्रामस्थांसाठी हे खड्डे धोकादायक ठरणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

