राजापूर-महायुती, महाविकास आघाडीबाबत अजूनही संभ्रम
महायुती, महाविकास
आघाडीबाबत अजूनही संभ्रम
राजापूर तालुका; एकही अर्ज दाखल नाही
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १९ः जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती वा महाविकास आघाडी करण्याबाबत मित्रपक्षांमध्ये चर्चा आणि बैठका सुरू आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याला अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना महायुती वा महाविकास आघाडीबाबत अद्यापही संभ्रमावस्था कायम आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये महायुती वा महाविकास आघाडी होणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी (ता. १९) एकाच दिवसामध्ये तालुक्यामध्ये ५४ उमेदवारी अर्ज वितरित केले आहेत. आजपर्यंत ११० उमेदवारी अर्ज वितरित झाले असले तरी, जिल्हा परिषद वा पंचायत समिती निवडणुकीसाठी तालुक्यामध्ये अद्याप एकही उमेदवारी अर्ज सादर झालेला नसल्याची माहिती निवडणूक विभागातून देण्यात आली. त्यामुळे शेवटच्या दोन दिवसांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल होण्याला इच्छुकांची भाऊगर्दी होणार आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे सहा गट आणि पंचायत समितीच्या बारा गणांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी करण्यासह जागा वाटपाबाबत त्या-त्या मित्रपक्षांच्या बैठका आणि चर्चाही सुरू आहेत. मात्र, निवडणुका जाहीर होऊन चार-पाच दिवसांचा कालावधी उलटला तरी, अद्यापही महायुती वा महाविकास आघाडीवर अद्यापही शिक्कामोर्तब झालेले नाही. त्याचवेळी जागा मित्रपक्षांमध्ये जागा वाटपाबाबतही एकमत झालेले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

