आचारसंहितेमुळे आंदोलने ‘बॅन’

आचारसंहितेमुळे आंदोलने ‘बॅन’

Published on

19806

आचारसंहितेमुळे आंदोलने ‘बॅन’

जिल्हा परिषदेचे आवाहन; नोटिसा दिलेल्यांना पत्र

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २४ ः जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने प्रजासत्ताक दिनी कोणतेही आंदोलन, मोर्चा, धरणे, उपोषण, निदर्शने, आत्मदहन किंवा तत्सम निषेधात्मक कृती करू नये. आपल्या उपोषणाच्या अर्जाच्या अनुषंगाने आवश्यक नियमोनुचित कार्यवाही जिल्हा परिषद कार्यालयाकडून सुरू असून, त्याची सद्यस्थिती विनाविलंब कळविण्यात येईल, असे पत्र जिल्हा परिषदेच्यावतीने प्रजासत्ताकदिनी (ता. २६) उपोषणाच्या नोटिसा दिलेल्या व्यक्तींना देण्यात आले आहे.
पत्रात म्हटले आहे की, आपले उपोषणसंदर्भातील निवेदन या कार्यालयास प्राप्त आहे. मात्र, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात भारत निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग यांनी १३ जानेवारीला आदर्श आचारसंहिता लागू केलेली आहे. तसेच प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय महत्त्वाचा दिवस असून, त्या दिवशी शासकीय कार्यक्रम, ध्वजवंदन समारंभ व कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने शांततापूर्ण वातावरण राखणे अत्यावश्यक आहे. या सर्व बाबी विचारात घेता, आदर्श आचारसंहिता तसेच सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने २६ जानेवारीला कोणतेही आंदोलन, मोर्चा, धरणे, उपोषण, निदर्शने, आत्मदहन किंवा तत्सम निषेधात्मक कृती जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, शासकीय कार्यालयीन आवारात किंवा त्यास लागून असलेल्या परिसरात आयोजित करणे कायदेशीरदृष्ट्या उचित ठरणार नाही. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या तसेच शासकीय कार्यक्रमांची शांततापूर्ण अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने हे अत्यावश्यक आहे. आपल्या उपोषणाच्या अर्जाच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही जिल्हा परिषद कार्यालयाकडून सुरू असून, त्याची सद्यस्थिती आपणास विनाविलंब अवगत करण्यात येईल. ही बाब गांभीर्याने लक्षात घेऊन आदर्श आचारसंहिता व लागू कायदेशीर तरतुदींचे पालन करून नियोजित उपोषण स्थगित करावे. तरीही उपोषणाच्या निर्णयावर ठाम राहिल्यास आणि त्याबाबत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास आपण सर्वस्वी जबाबदार राहाल, असे नमूद केले आहे. ही पत्रे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांच्या स्वाक्षरीने काढली आहेत.
....................
आचारसंहितेचे पालन आवश्यक!
अशी पत्रे सर्व उपोषणकर्त्यांना पाठविली आहेत. आचारसंहिता कालावधीमध्ये सर्वच कर्मचारी निवडणुकीच्या कामकाजासाठी कार्यमुक्त करण्यात आलेले आहे. त्यामुळे उपोषणाच्या अर्जांवर कार्यवाही करणे शक्य होत नाही. आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन होण्याकरिता व शांततापूर्ण प्रजासत्ताक दिन साजरा होण्याकरिता हे पत्र काढण्यात आले आहे. आचारसंहिता कालावधीनंतर उपोषणकर्त्यांच्या पत्रांसंबंधी उर्वरित कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे आचारसंहिता कालावधीमध्ये उपोषण करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com