ग्राम रोजगार सहाय्यकांचा आज बेमुदत संप
ग्रामरोजगार सहाय्यकांचा आजपासून संप
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३१ : रत्नागिरी तालुक्यातील सर्व ग्रामरोजगार सहाय्यकांनी विविध मागण्यांसाठी रविवारपासून (ता. १ फेब्रुवारी) बेमुदत संप पुकारला आहे. मनरेगा कार्यरत असलेल्या कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या संपाला पाठिंबा दिला आहे.
गेले ५ ते १० वर्षे ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी ते इतर कर्मचारी यांच्या सहाय्याने गावातील मनरेगाची सर्व कामे ग्रामरोजगार सहाय्यक करत आहे. यामध्ये मस्टर काढणे, जिओ टॅगिंग करणे, ई-केवायसी करणे, कामांचे प्रस्ताव सादर करणे व मस्टर व एमबी तालुक्याच्या ठिकाणी पोच करणे, अशा प्रकाराची अनेक कामे ग्रामरोजगार सहाय्यक कमी मानधनात करत आहे. त्यांच्याकडे कधी कधी तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी पैसे नसतात. त्यांना मिळणारे मानधन हे अतिशय तुटपुंजे आहे. मानधनातून उदरनिर्वाह करणे शक्य होत नाही. त्यामुळे कामगार व कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत वेळोवळी शासनाकडे पत्रव्यवहार करूनही शासन दुर्लक्ष करत आहे, असे सहाय्यकांचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

