रत्नागिरी- रामरक्षा म्हणजे अमूल्य ठेवा
rat23p3.jpg-
32674
रत्नागिरी : राष्ट्रसेविका समिती आयोजित रामरक्षा भावार्थ कार्यक्रमात बोलताना संध्या सप्रे. सोबत स्मिता जोशी.
रामरक्षा म्हणजे अमूल्य ठेवा
संध्या सप्रे; राष्ट्रसेविका समितीतर्फे श्रीराम उत्सव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : "रामरक्षा हा आपल्या ऋषीमुनींनी दिलेला एक अमूल्य ठेवा आहे. हा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द करणे, हे आपले कर्तव्य आहे. जर पूर्ण रामरक्षा म्हणणे शक्य नसेल तर दैनंदिन कामे करताना केवळ ''राम'' या दोन अक्षरांचा जप केला तरी जीवनात सफलता येते आणि जीवन सार्थकी लागते. हा सोपा मार्ग आपण आपल्या मुलांपर्यंत आणि समाजापर्यंत पोहोचवला पाहिजे. रामनामाच्या बळावर आपण जीवनरूपी भवसागर नक्कीच तरून जाऊ शकतो" असे प्रतिपादन संध्या सप्रे यांनी केले.
दक्षिण रत्नागिरी राष्ट्रसेविका समितीतर्फे श्रीराम नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून टिळकनगर उद्यान येथे श्री रामरक्षा भावार्थ सार कार्यक्रमात त्या बोलत होत्या. राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका मावशी केळकर यांनी लिहिलेल्या रामायणावरील प्रवचनांच्या वाचनातून रामायणाकडे पाहण्याचा एक तार्किक दृष्टिकोन समितीच्या सेविकांना सातत्याने मिळत आला आहे. याच प्रेरणेतून या कार्यक्रमाचे आयोजन केले. सुरवातीला प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शहर बौद्धिक प्रमुख स्मिता जोशी यांनी प्रास्ताविक केले. दक्षिण रत्नागिरी सह-प्रचारप्रमुख कामाक्षी गद्रे यांनी आभार मानले.

