पाली - डोळ्यांचे पारणे फेडणारे निसर्गसौंदर्य, तब्बल 240 किमी लांबीचा विस्तीर्ण समुद्र किनारा, निसर्गरम्य ठिकाणे, ऐतिहासिक व धार्मिक वारसे आणि स्थळे लाभलेला रायगड जिल्हा पर्यटनासाठी आंदण आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपुर्ण भारतातील पर्यटक, इतिहासप्रेमी, पर्यावरण अभ्यासक व भाविक उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी जिल्ह्यात दाखल होत आहेत. मात्र वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे.