Traffic Jams and Poor Roads Harm Tourism in Raigad

Traffic Jams and Poor Roads Harm Tourism in Raigad

Sakal

Raigad Traffic Congestion : रायगड जिल्ह्यात वाहतूक कोंडी; खराब रस्त्यांमुळे पर्यटन व्यवसाय संकटात!

Tourist Inconvenience : रायगड जिल्ह्यातील रस्त्यांची खराब अवस्था आणि वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांना मोठी गैरसोय होऊ लागली आहे. यामुळे पर्यटन व्यवसायावर परिणाम होतो आहे, आणि पर्यटक इतर जिल्ह्यांकडे वळत आहेत.
Published on

पाली : डोळ्यांचे पारणे फेडणारे निसर्गसौंदर्य, तब्बल 240 किमी लांबीचा विस्तीर्ण समुद्रकिनारा, माथेरान सारखे थंड हवेचे ठिकाण ऐतिहासिक आणि धार्मिक वारसे व स्थळे लाभलेला रायगड जिल्हा पर्यटनासाठी नंदनवन आहे. त्यामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपुर्ण भारतातील पर्यटक, इतिहासप्रेमी, पर्यावरण अभ्यासक व भाविक जिल्ह्यात दाखल होत असतात. उन्हाळी, दिवाळी व नाताळच्या सुट्ट्यांमध्ये तर पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणचे पर्यटक रायगड जिल्ह्यातील पर्यटन, एैतिहासीक व धार्मिक स्थळांवर गर्दी करतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com