Raigad Traffic Congestion : रायगड जिल्ह्यात वाहतूक कोंडी; खराब रस्त्यांमुळे पर्यटन व्यवसाय संकटात!

Tourist Inconvenience : रायगड जिल्ह्यातील रस्त्यांची खराब अवस्था आणि वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांना मोठी गैरसोय होऊ लागली आहे. यामुळे पर्यटन व्यवसायावर परिणाम होतो आहे, आणि पर्यटक इतर जिल्ह्यांकडे वळत आहेत.
Traffic Jams and Poor Roads Harm Tourism in Raigad

Traffic Jams and Poor Roads Harm Tourism in Raigad

Sakal

Updated on

पाली : डोळ्यांचे पारणे फेडणारे निसर्गसौंदर्य, तब्बल 240 किमी लांबीचा विस्तीर्ण समुद्रकिनारा, माथेरान सारखे थंड हवेचे ठिकाण ऐतिहासिक आणि धार्मिक वारसे व स्थळे लाभलेला रायगड जिल्हा पर्यटनासाठी नंदनवन आहे. त्यामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपुर्ण भारतातील पर्यटक, इतिहासप्रेमी, पर्यावरण अभ्यासक व भाविक जिल्ह्यात दाखल होत असतात. उन्हाळी, दिवाळी व नाताळच्या सुट्ट्यांमध्ये तर पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणचे पर्यटक रायगड जिल्ह्यातील पर्यटन, एैतिहासीक व धार्मिक स्थळांवर गर्दी करतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com