Ratnagiri News : 'पर्यटनासह मच्छीमारांचे ५० कोटींचे नुकसान'; मे महिन्यातील पावसाने गणित कोलमडले

हर्णै बंदरात ताजी मासळी खरेदीसाठी झुंबड उडते तसेच सुकी मासळीलाही प्रचंड मागणी होती; मात्र यावर्षी पावसामुळे अंतिम टप्प्यातील उत्पन्नाला मच्छीमारांना मुकावे लागले. शेवटच्या टप्प्यात कोळंबी, पापलेट, म्हाकुळ, बिलजा यासारखी मासळी मच्छीमारांच्या जाळ्यात मिळत होती; मात्र त्यावर पाणी सोडावे लागले.
Damaged fishing boats and deserted tourist beaches due to unseasonal May rains causing huge financial loss.
Damaged fishing boats and deserted tourist beaches due to unseasonal May rains causing huge financial loss.eSakal
Updated on

-राधेश लिंगायत

दापोली : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळसदृश परिस्थितीमुळे यंदा मे महिन्यातच मुसळधार पाऊस पडला. त्याचा फटका मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध दापोली तालुक्यातील पर्यटन व्यावसायिकांना बसला आहे. ऐन सुटीच्या हंगामात पंधरा दिवस अगोदरच मासेमारी आणि पर्यटन हे दोन्ही व्यवसाय बंद करण्याची वेळ व्यावसायिकांवर आली आहे. त्यामुळे सुमारे ५० कोटींचे नुकसान सहन करावे लागणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Why is Vajrai Waterfall famous?
Big Push for Heritage Tourism: Historic Wadas Eligible for Grants and Tax Relief
Sindhudurg monsoon tourism update
Monsoon Tourism India
Marathi News Esakal
www.esakal.com