
सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - शहरात ठिकठिकाणी पाणीटंचाईची समस्या जाणवत असताना आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांचे लक्ष वेधले. मुबलक पाणीसाठा असतानासुद्धा शहरात अनेक ठिकाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. सद्यस्थितीत पालिकेकडून एकवेळ पाणी सोडले जात असून पाण्याच्या प्रवाहाचा वेग सुद्धा अतिशय कमी आहे. त्यात सुधारणा करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन जीर्ण झाल्यामुळे ही समस्या उद्भवत आहे; मात्र तरीसुद्धा ज्याठिकाणी योग्य पाणीपुरवठा होत नाही, त्याठिकाणी उपाययोजना करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळू, असे आश्वासन श्री. जावडेकर यांनी दिले.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी, युवक तालुकाध्यक्ष राजू धारपवार, हिदायतुल्ला खान, संतोष जोईल, बावतीस फर्नांडिस, इफ्तिकार राजगुरू, नवल साटेलकर, देवा टेमकर, हर्षद बेग, अगस्ती फर्नांडिस उपस्थित होते.
यावेळी तालुकाध्यक्ष दळवी म्हणाले, ""शहरातील सर्वोदयनगर, सालईवाडा, होळीचा खुंट आदींसह अनेक ठिकाणी अतिशय तुरळक प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. सद्यस्थितीत एक वेळेस पाणी पुरवठा सुरू असताना पाण्याचा प्रवाह अतिशय कमी असल्यामुळे तो पाणीपुरवठा रोजच्या दैनंदिन वापरायला पुरत नाही. त्यामुळे नागरिकांची पाण्यावाचून मोठी गैरसोय होत आहे. होणारी गैरसोय टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना राबविल्या जाव्यात.''
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.