खेडमध्ये १७ गावांमध्ये पाणीटंचाई

खेडमध्ये १७ गावांमध्ये पाणीटंचाई

३ (पान ६ साठी)

खेडमध्ये १७ गावांमध्ये पाणीटंचाई

खेड, ता. १ : तालुक्यात टंचाईग्रस्त गाव-वाड्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सद्यस्थितीत १७ गावे ४४ वाड्यांना पाणीटंचाईचे भीषण चटके बसत आहेत. अजूनही टंचाईग्रस्त गाव-वाड्यांची मदार एक शासकीय व एक खासगी अशा दोन टँकरवर अवलंबून आहे. या दोन टँकरच्या १३२ फेऱ्या धावत असल्या तरी अपुऱ्या टँकरअभावी तहानलेल्या ग्रामस्थांना टँकरची प्रतीक्षा करावी लागत आहे.
दुर्गम भागात वास्तव्यास असलेल्या धनगरवाड्यांतील ग्रामस्थांना पाण्यासाठी सर्वाधिक आक्रोश करावा लागत आहे. तालुक्यात ८ एप्रिलपासून पाण्याचा टँकर धावू लागला आहे. आतापर्यंत १७ गावे ४४ वाड्यांतील ग्रामस्थ टँकरच्या पाण्यासाठी आक्रोश करत आहेत. दोनच टँकर उपलब्ध असल्याने प्रशासनाला पाणी पुरवठ्यासाठी कसरत करावी लागत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com