INDvSA : धरमशालात कोसळधार; पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द

Dharamshala-Stadium
Dharamshala-Stadium

धरमशाला : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान होणारा पहिला टी-20 सामना संततधार पावसामुळे रद्द करण्यात आला. याची अधिकृत माहिती बीसीसीआयने ट्विटरवरून दिली. धरमशाला येथे गेल्या दोन-तीन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे.

रविवारी (ता.15) दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सामना उशिरा खेळविण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. काही वेळाने पाऊस ओसरला. मात्र, सामना सुरू होण्यापूर्वी पाऊस पुन्हा सुरू झाल्याने पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.  

रविवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे मैदानात पाणी साचले होते. ते पाणी काढण्यासाठी काही कर्मचारी मैदानात उतरले. मात्र, पावसाचा जोर वाढतच गेला. शेवटी सामना रद्द करण्यात आला. 

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये तीन टी-20 सामने होणार आहेत. त्यापैकी आज धरमशाला येथे होणारा पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. चंदीगड येथे दुसरा टी-20 सामना बुधवारी (ता.18) होणार असून तिसरा टी-20 सामना रविवारी (ता.22) बेंगलोर येथे होणार आहे. 

आगामी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका महत्त्वाची ठरणार असल्यामुळे कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापक त्याकडे पाहात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com