

Sports News
esakal
क्रीडा क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी विकसित भारत@२०४७ अंतर्गत तीनदिवसीय चिंतन शिबिर २४ ते २६ एप्रिलला श्रीनगर येथे आयोजित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय बॅडमिंटन संघाचे मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी क्रीडा क्षेत्राचा घेतलेला आढावा.
चिंतन शिबिर या उपक्रमात सहभागी होण्याची मला दोन वेळा संधी मिळलेली असल्यामुळे, हा भारतीय क्रीडाविश्वातील अत्यंत योग्य वेळी हाती घेण्यात आलेला प्रभावी उपक्रम असल्याचे मी आत्मविश्वासाने सांगू शकतो. आपल्या देशाच्या क्रीडा क्षेत्राच्या प्रवासात आपण एका महत्त्वाच्या वळणावर पोहोचलो असून या टप्प्यावर उद्देश, गुंतवणूक आणि प्रेरणा या तिन्ही गोष्टींचा मोठा संगम अनुभवास येत आहे.