भारताचा महान फलंदाज विराट कोहली व अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा यांनी गुरुवारी मुंबईत पार पडलेल्या मिरवणुकीचे व्यवस्थापन अव्वल दर्जाचे असल्याकारणाने येथील पोलिसांचे कौतुक केले आहे. विश्वविजेत्यांचे अभिनंदन करण्यासाठी आलेल्या जनसागराला नियंत्रणात ठेवल्याबद्दल कोहली व जडेजा यांनी मुंबई पोलिसांची स्तुती केली.
भारतीय संघाने वेस्ट इंडीजमध्ये टी-२० विश्वकरंडक पटकावल्यानंतर गुरुवारी मायदेशात त्यांचे आगमन झाले. पहाटे नवी दिल्लीत पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत संवाद साधला. त्यानंतर विश्वविजेता संघ मुंबईत दाखल झाला. मुंबईतील विमानतळापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास वानखेडे स्टेडियमवर थांबला. असंख्य क्रिकेटप्रेमींनी वानखेडे स्टेडियम गाठले. आपल्या लाडक्या खेळाडूंनी केलेल्या देदीप्यमान कामगिरीला मानवंदना देण्यासाठी हजारो क्रिकेटप्रेमी तिथे पोहोचले होते. अशा परिस्थितीत मुंबई पोलिसांनी येथील परिस्थिती नियंत्रणात ठेवली.
विराट कोहली याने सोशल मीडियावर मुंबई पोलिसांचे आभार मानले. तो म्हणाला, टीम इंडियाच्या मिरवणुकीदरम्यान उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुंबई पोलिसांना धन्यवाद. तुमचे समर्पण आणि सेवा अत्यंत प्रशंसनीय आहे. रवींद्र जडेजाकडूनही सोशल मीडियावर आभार व्यक्त करण्यात आले.
विश्वविजेत्यांचा अभिमान
भारताचा अष्टपैलू खेळाडू रवीचंद्रन अश्विन यानेही विश्वविजेत्यांचा अभिमान असल्याचे मत सोशल मीडियावरून व्यक्त केले. तो म्हणाला, नवी दिल्ली व मुंबई येथील सेलिब्रेशनचे व्हिडीआे व फोटो बघितले. मन भरून आले. या देशातील जनता या खेळावर निरतिशय प्रेम करणे हे यावरून प्रकर्षाने दिसून येते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.