Brian Lara : स्ट्राइक रेटपेक्षा विराटचा प्रभाव मोठा ; ब्रायन लारा,वर्ल्डकपसाठी कोहली भारतीय संघात असणे गरजेचे

विराट कोहलीचा प्रभाव हा स्ट्राइक रेटपेक्षा मोठा आहे. त्यामुळे येत्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत तो भारतीय संघात असणे महत्त्वाचे आहे, असे मत वेस्ट इंडीजचा माजी महान फलंदाज ब्रायन लारा याने व्यक्त केले.
Brian Lara
Brian Larasakal

बंगळूर : विराट कोहलीचा प्रभाव हा स्ट्राइक रेटपेक्षा मोठा आहे. त्यामुळे येत्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत तो भारतीय संघात असणे महत्त्वाचे आहे, असे मत वेस्ट इंडीजचा माजी महान फलंदाज ब्रायन लारा याने व्यक्त केले. या आयपीएलमध्येही सलामीला खेळत असलेला आणि यंदा पहिले शतक करण्याचा मान मिळवलेल्या विराट कोहलीचा अपेक्षेपेक्षा कमी असलेला स्ट्राईक रेट चर्चेचा विषय ठरलेला आहे. राजस्थानविरुद्ध त्याने केलेली ६७ चेंडूंतील शतकी खेळी ही आयपीलमधील संयुक्तपणे संथ खेळी ठरली. २००९ मध्ये मनीष पांडेने ६७ चेंडूत शतक केले होते.

स्ट्राईक रेट (धावांसाठी घेतलेले चेंडू) हा फलंदाजीच्या क्रमावारीनुसार वर-खाली होणारा असतो. सलामीला खेळणाऱ्या फलंदाजांचा सरासरी स्ट्राईक रेट कमीत कमी १३० ते १४० पर्यंत असतो, पण मधल्या फळीत फलंदाजी करत असताना हाच स्टाईक रेट कमीत कमी १५० ते १६० पर्यंत असणे गरजेचा असतो, पण आयपीएलमधील अखेरच्या काही षटकांमध्ये दोनशेपेक्षा अधिक धावांच्या स्ट्राईक रेटने धावा फटकावल्या जात आहेत.

सलामीवीर म्हणून खेळत असलेल्या कोहलीचा स्ट्राईक रेट १३० पर्यंत असतो, पण त्याची इनिंग संपता संपता तो १६० पर्यंत गेलेला असतो. त्यात टीका करण्यासारखे काही नाही, ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली असे भारतासाठी पहिले तीन फलंदाज असायला हवे, आयपीलमधील बंगळूर संघाबाबत बोलायचे तर विराट हा त्यांच्यासाठी एकखांबी तंबूसारखाच आहे, असे लारा म्हणतो.

रोहित आणि विराट ही सलामीची जोडी असेल तर कोणत्याही प्रतिस्पर्धी संघाला धडकी भरवणारी असू शकेल; परंतु विराटऐवजी नवोदित खेळाडूला भारतीय संघ व्यवस्थापन प्राधान्य देण्याचा अधिक विचार करेल, अशी शक्यता लारा याने व्यक्त केली.

रोहित शर्मासह सलामीला यशस्वी जयस्वालचे नाव आघाडीवर होते; परंतु या आयपीएलमध्ये तो अपयशी ठरत आहे. त्यामुळे कदाचित तेथे शुभमन गिलला प्राधान्य मिळू शकेल. ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघात आपले स्थान पक्के असावे, याचे दडपण कदाचित यशस्वी जयस्वालवर आले असावे, म्हणून अधिक आक्रमक फलंदाजीच्या विचारात तो विकेट गमावत आहे, असे लाराचे म्हणणे आहे. राजस्थान संघातून खेळणाऱ्या जयस्वालला आतापर्यंत चार सामन्यांत मिळून केवळ ३९ धावाच करता आलेल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दोन द्विशतके करणारा जयस्वाल आयपीएलमध्ये मात्र अपेक्षा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com