

दुबई, ता. ३ : भारताचा संघ समतोल आणि मजबूत आहे. त्यांचे फलंदाज चांगल्या लयीत आहेत. टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांकडे अनुभव आहे. आम्ही मधल्या षटकांमध्ये भारताच्या फिरकीला कसे तोंड देतो यावर सामना कुठे झुकणार हे ठरणार आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथ चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उपांत्य लढतीच्या पूर्वसंध्येला म्हणाला.