

India Test Cricket
esakal
End of an Era in Indian Test Cricket: भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या दशकभरात भारताला घरच्या मैदानावर अपराजित ठेवण्यात आणि अनेक ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावणारे पाच दिग्गज खेळाडू आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत.
विराट कोहली, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि रविचंद्रन अश्विन या पाचही खेळाडूंनी एकामागून एक क्रिकेटला अलविदा म्हटल्यामुळे भारतीय कसोटी क्रिकेटमधील एका सुवर्णयुगाचा शेवट झाला अस म्हणू शकतो.